►भर पावसात सुरु असलेले रस्त्याचे काम थांबविले

वेतोरे ते दाभोली या मुख्य रस्त्याचे काम बरेच दिवस मंजूर होते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान आज भर पावसात संबंधित ठेकेदाराने हे काम सुरु केले. याबाबत जिल्हापरिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांच्याशी संफ साधला असता लोकांच्या मागणीमुळे काम सुरू करावे लागले असे त्यांनी सांगितले. मात्र भर पावसात काम केल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास याला जबाबदार कोणअसा सवाल करत जिल्हापरिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी हे काम बंद पाडले आहे.

Leave a Reply

Close Menu