बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा, तेलंगणा या राज्यातून तेथील नागरिक स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि बेरोजगारी याला कंटाळून त्या राज्यातून पलायन करतात. आज मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात रोजगाराच्या संधी या लोकांना तिथे आकर्षित करतात. मुंबई तर भारताचे व्यावसायिक उर्जास्थान आहे. परंतु लोंढ्यांचा या शहरांच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येऊन ही शहरे लोकांच्या ओझ्याखाली गुदमरू लागल्या आहेत. पण अशा लोकांना थांबविणार कसे?