एक पत्र माझ्या बाप्पाक………!

प्रिय गणपती बाप्पा,

          पत्रास कारण की… कारण काय लिव? येक नाय, शंभर आसंत. पण सध्या जा काळजाक झोंबताहा, त्याच इषयाक हात घालून पत्राक सुरवात करतंय..

         ते दिसा नागपंचमी झाली. हेरशी तर येताच पण त्या घडीक गावाची कितकी याद येय होती, ह्या नाय सांगलंलाच बरा. बघशीत तेच्या व्हाटस्अॅप स्टेटसवर नागोबाचे फोटू.. जितक्या बघून बरा वाटला, तितक्याच मन बावान गेल्यासारख्या वाटला. पोटा पाण्यासाठी भायर पडला की कितके गोष्टीक आम्ही मुकतंव ना ह्याची तीव्र जाणीव झाली त्या येळाक.

      नागपंचमी दिसा दोम्पाराच जेवणाआधी बापाशीचो फोन इलो. लगना आधी मीया रंगयलंलो, पण आता धुसर झालेलो भिंतीवयलो नागोबा माझ्या बाबान आजूनंय वळंयत तसोच ठेयलोहा. तेच्याच फुड्यात पाटार बसयलेल्या नागोबाच्या पूजेचो फोटो तेनी माका धाडल्यान आणि त्या टायमाक भिंतीवरती नागोबा काढूची हौस, खटपट नजरेफुडसून गेली. आवशीच्या हातच्या पातोळ्यांचो एखादो फोटो तरी पाठया म्हटलंय, तर आमका कामा आसंत म्हणत आईनच फोन कट करुक लायलो. (आवशीचो जीव म्हणतंत ना तो ह्यो) आणि नागपंचमीच्या सणाची पातोळे स्पेशल उत्सुकता थंयच सोपली.

    सांजे दोनदा फोन लायलंय. दोम्पारचे पातोळे वाड्यात म्हशीक व्हरान घालुक गेलेल्या आवशीन हासड घालीत तिस-या रिगेक फोन उचल्लेन. ‘‘ते गणपती शाळेत गेलेहंत पाट दिवक.‘‘ म्हणत तिना नकळत तुझी आठवण करुन दिलेन. तुझ्या येण्याचो दिवस लागी येताहा, तरीही आम्ही हतबल आसू, असा वाटान फुडे बोलताना नाराजीचोच सूर लागलो.

       बोलता बोलता ल्हानपणी परतेक वरसा तुझी मूर्ती कशी सांगाची, त्यावरसून होणारी बारक्यांची बैठक आठवान मन भरान इला. कसो आसतलो आमचो गणपती? ह्योच विचार. आदल्या दिसा तुका घराकडे हाडीसर उत्सुकता शिगेक पोचलेली. तुका एक नजर बघूक जीव कितको आतुर असायचो, म्हायत हा? हळूहळू कधी मोठी झालू आणि लोकाच्या घराक गेलू, कळलाच नाय. आता आदल्या दिसा मुंबयसून गावाक गेला, काय पाठोपाठ तुका आणुची लगबग आसता. दारार उभ्या रवान नजार काढताना आजूनय तुका तसाच टक लावन बघिनसारा वाटता. तुझी पावला, शेडीच्या बुटांनी ओढत तुझो घरातलो प्रवेश बघताना आतुर असणारा मन आजूनय तितक्याच खुलखुलता हा!

       तु मखरात बसल्यानंतर पुजा, आरती, जेवणाची, भजनक-यांची वर्दळ, फुगडी, ह्यात दिस कशे भर्रकन निघान जातंत समाजनाच नाय. दररोज सकाळी उठल्यार तुझ्या पायार जास्वंदीचा फुल ठेयताना फक्त तुका मन भरुन बघूक गावता तितक्याच. मगे हडे थडे बोवळासर उसंतच नसता. रानातल्या तरतरीत फळाफुलांनी, सजयलेल्या, माटये खालच्या तुझ्या मुर्तीचा तेज दर दिसा कसा वाढत जाता ह्या समजाच्या आधीच केवा विसर्जनाचो दिस लागी येता ता कळणाच नाय. सांजे पाटउचलूक घेतलो काय बारकी पॉरा तर शाप तोंडा वायट करतंत. जाताना तुझोय चेहरो बावलेलो दिसता. भवतेक आमका सोडून जाताना तुका सुदा जड वाटत आसतला म्हणान चेहरो उतारलो, ही आपली आमची समजूत..

      ‘फुडल्या वर्षी लवकर या..असा जल्लोषात म्हणत, डोळेभरून बघीत तुका हसत हसत निरोप देतू आम्ही. पुन भुतुतसून आम्हीय रडतूच रे..! तुका निरोप द्विन येताना तुझो रिकामो झाल्ललो पाट कितको जड लागता ह्या आमकाच म्हायत! तुझो तो रिकामी पाट आमका वरासभराची राखण लावन जाता. घरात परतान इला काय सगळा घार कसा उदास दिसता. निरांजन एकटाच मंद पेटत आसता तुझ्या पाटार. नजार जाता येव्न जाव्न थंयच. जेवणाची कसली ती इच्छाच आसना नाय त्या रातीक.

      दुसरो दिस उजाडता आणि तुझ्या निमतान घरात जमलली आम्ही पुन्हा परतीची वाट धरतू आणि परत कामधंद्याक लागतू. हळूहळू कामाच्या यापात वरास एकदाचा ढकलान जाता. नयीन वरास येता आणि वांगडाक येता नयीन कॅलेंडर. ता हातात पडला रे पडला की, सगळा सोडून आम्ही पयली पाना परततो, ती ऑगस्ट, सप्टेंबर म्हयन्याची. कारण, पयली उत्सुकता आसता तु केवा येतलंय? ह्याचीच.

        चतुर्थीची ती एकच तारीख डोक्यात ठेवन पूर्ण वरासभराच्या सुटयेची अॅड्जेस्टमेंट, तिकिटीच्या बुकिंगची तयारी चालू होता. ऐन टायमाक सुटयेचा बिनासला तर मालकाक गाळी घालून, सगळा फाट्यार मारुन धावत येतंत तुझ्या पायार माथो टेकवक येताना मार्केटात फिरान नयीन काय दिसात ता घेवक फिरतंत बाजारभर. मुंगळेक रिगाक जागा नाय अशी परिस्थिती असलेल्या रेल्वेतसून तुझ्या सजावटीचा, लायटींगचा सामान सांभाळून हाडतंत घराक. ह्यो झगमगाट, देखावो तिया मागनंय नाय बाप्पा. ह्या आमकाय म्हायती हा. तरी तुझ्या येण्याचा ४-८ दिवस रवण्याचा खूप कौतूक आसता रे सगळ्यांका! हौस मौज करुचो ह्यो एकच सण आमचो. म्हणान रंगरंगोटी, साफसफाई, डेकोरेशन सगळा जास्तच करतत. जेव्हा तुका वळंयत सजलेल्या मखरात बसलेलो बघतू ना, तेव्हा अख्ख्या घराचाच देवूळ झालाहा इतक्या मंगल नि प्रसन्न वाटता. घर आठ दिवस निसता माणसांनी भरान जाता पै- पावणे, शेजारी पाजारी, गावकरी सगळे भेटतंत तुझ्या निमतान ह्या सणाक. दुःख काळजी, चिंता सगळा खंयच्या खंय नायनपुट होता ह्या दिसात.

        पून अवनू.. बाप्पा, चुटपुट लागान रवली. ह्या सगळ्याक आम्ही मुकतलू ह्येची. हजार येळा येवचा मन करता गावाक. दिसता, धावत येवचा तुझ्या सणाक..पून आपल्याच गावात, आपल्याच घरात येताना आता शंभर येळा इचार करूची येळ इलीहा. ह्या महामारीन सगळ्यांका जाग्यारंच बसाक लायला ह्या तुझ्या पासून काय लपलाहा काय? कितेक लोकांचे नोकरे गेले ह्याच्यात. हातावरती पॉट असणारे तर बिचारे कर्मानच मेले आणि भविष्याच्या चिंतेन जेका तेका धडकी भरली. चार म्हयने घरात बसान जितक्या होता, नव्हता पदराक ता सगळा संपत इला. खावचा काय आणि येवचा कसा ह्यो प्रश्न.

      ह्यो आजार जातंलोजातंलो म्हणतू, म्हणासर आजूनच वाढाक लागलो. भायल्या राज्यात जाणारे गेले, आणि आपलो गाव भोवान परत मोंबयक इले सुदा. पण आमका कोकणात जावक मातर कडक नियम लायले. बंधना इली. इतके दिस वगी रवलु आता कायतरी होयत ह्या आशेन. पण कसला काय? एकतर खिशात काय उरला नाय आणि ह्या घडीक खाजगी गाडयेन येशीत तर तेंची भाडी परवाडन्या इतकी रवली नाय. सांग आता, करुचा तरी काय?

      बरा, हडेचा तडे करून, हुल गे हुल करीत गावाक इलू आणि दुर्दैवान आमका १५ दिसाच्या क्वारंनटाईन नंतर उसरा कोरोना झालोच तर तुझी उठबस कोण करतलो आणि कशी? लोकांच्या मनात आधीच कितको भय! ह्या सणावरती सुदा आता भितीचा आणि चिंतेचा सावाट इला ह्या काय आता येगळा सांगा होया?. तुझ्या सेवेत खंड पडाक नको ह्यो विचार येताच ना मनात!. मगे येवचा तरी खंयच्या आशेन? जावंदे..!

      रवान रवान आपले सारखे एकेक प्रश्नच पडतंत. कोणाक आमच्या भावनांशी काय लेना देना आसा, असाय दिसना नाय. दिसता ता फक्त राजकारण. आसो. त्या विषयात माका रस नाय. म्हणान तुझ्याकडे इलंय मन मोकळा करुक. बाकी कोणाक नाय पडली आमची, फक्त तु इतक्या सांग, निदान तुका तरी आमची तगमग कळतली ना रे? परतेकाच्या घरात दरवरसा दिसणारी माणसा अवनू नाय दिसली, तर तुका तरी उघडा उघडा वाटतला, ना रे? आरतेच्या टायमाक टाळ वाजवक झगडणारी, धाकटी चिली पिली अवनू नसतली, तुझी तरी नजार तेंका हडेतडे शोधतली ना रे?.. पहिल्या दिसाचे पंक्तीक चार पाना कमीच लागतंली, त्या रिकाम्या जागेर तुझे डोळे आमका सगळ्यांका शोधतले ना रे?

      हरताळकेच्या दोन दिसाच्या उपासाचो क्षीण इसरान पंचपक्वान्नाचो नैवेद्य बनयणारी, राती अधीमधी उठान तुझा तॅल वात बघणारी सुन, तुका तरी अवनू आठावतली ना रे? पेटारे लायताना अगरबत्ती-सुरसुरा पेटवक धावत तुझ्या समयकडे येणारी आणि हळूच डोळे मिचकायत तुझ्याकडे बघणारी आमची धाकटी तुका नाय दिसली, तर तुझो तरी जीव कासावीस होतलो ना रे?

      परतेकाच्या घरातल्या भजनाक हजेरी लायणारे, तालात येवन ठेको धरणारे आणि भिंतीक वडगान उसळीचो पुडो फुसान खाणा-या चाकरमानी भजनका-याची गैरहजेरी तुका तरी या वरसा जाणावतली ना रे?

      हौश्या दिसा हौशेन नेसाक रेडीमेड नव्वारी साडी घेवन येणारी आणि आवाटभर मुरडणारी बायलमानसा बघून गालातल्या गालात हसणारो तू. अवनू तुका तेंची कमी जाणावतली ना रे?

    माका म्हायत आसा, कोणाक नाय वाटला तरी तुकातरी रुखरुख लागतली आमच्या शिवाय, आमच्या लेकरा-बाळांशिवाय… तुकाय गोड नाय लागाचे तुझ्या आवडीचो उकडीचो मोदक. पण बाप्पा.. याक सांगा? आम्ही एखाद वरसा गावाक जरी नाय इलू ना, तरी ह्यो जीव निसतो तळमळत आसता अकरा दिस ह्या कुडीत. अर्धो जीव तर आधीच गावाक पोचान थंय घुटमळत आसता. आता काय चलला असतला घराकडे, काय करत असतले, ह्योच विचार करून आम्ही मुंबयक सगळे सण, उत्सव साजरे करतू.

      अवनू ब-याच जणांच्या नशीबात ताच इला हा. पण पर्याय नाय.

      बरा… नाय नाय हुनता हुनता हातभर लांब झाला पत्र. निवांत बसलंय आसशील ना? अवनू तशी गडबड, धूमधाम कमीच आसतली ना, म्हणान म्हणतंय… वायच पाया पडान घेतंय हंयसूनच. दरवरसा आमका सुखी ठेय ह्या मागणा आसता. ह्यावरसा सगळ्यांका सुखात ठेय ह्या मागणा आसा. इतके म्हयने आमका सगळ्यांका ह्या महामारीपासून राखलंय, तसोच या फुडे पण राख. आणि ह्या कोरोनाचा दुखना इला तेचो नायनाटकर. तुझ्या आशिर्वादान सगळा यवस्थेत होतला ह्या म्हायतीच आसा. पून आता आजून उशीर नको. तुझ्या भक्तांकडसून काय चुकभूल झाली आसात तर ती पायाबुडी घाल आणि फुडच्या वरसाक तुझी शेवा आमका आमच्या मनासारखी जल्लोषात करूची संधी दे रे म्हराजा….!

   बरा,आता पत्र पुरा करतंय. तुझो आशिर्वाद कायम आमच्या सगळ्यांर आसांदेत ह्याच मागणा!!                                  गणपती बाप्पा मोरया!!!

– पूर्णिमा गावडे मोरजकर,

रोणापाल, सावंतवाडी, ९९८७१५७००७

This Post Has One Comment

  1. छान पत्र लिहिलंय👍. बाप्पा सर्वांना सुखात ठेवो आणि सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करो. गणपती बाप्पा मोरया🙏

Leave a Reply

Close Menu