वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली अशा दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी एकूण २२ तर आरवली ग्रामपंचायतीसाठी एकूण ३३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती वेंगुर्ला नायब तहसिलदार संतोष बांदेकर यांनी दिली. आरवली निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी जयेश राऊळ तर सागरतीर्थ निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हापरिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.