परराज्यांतील आंबा महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

    कोकणातील हापूस आंबा देशातील मोठ¬ा शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणनमंत्री अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु केले आहे. देशातील नवी दिल्ली, चंदिगड, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पणजी, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, भोपाळ या शहरांमध्ये आंबा महोत्सवांचे आयोजन करुन हापूस आंब्यास मोठ¬ा प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत मंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.

        परराज्यांमधील आंबा महोत्सवामध्ये जे शेतकरी सहभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, 7/12 उतारा (मागील 6 महिन्यातील), ओळखपत्र (आधार कार्ड झेरॉक्स) तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नावे दहा हजार रुपयांचा धनाकर्षासह आपला अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय रत्नागिरी, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी आवार, शांतीनगर, नाचणे, ता.जि.रत्नागिरी येथे सादर करावा. अर्जासोबत स्टॉलवर उपस्थित राहणा-या कुटुंबातील व्यक्ती व सहकारी यांचे ओळखपत्रासह शिफारस पत्र शेतक-यांनी देणे अर्जासोबत भौगोलिक मानांकनाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

        परराज्यात हापूस आंब्याकरीता बाजारपेठ स्थापन करण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नामध्ये कोकणातील शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी आंबा उत्पादकांना केले आहे. अधिक माहितीसाठी कपिल खामकर (8805652233) यांच्याशी संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Close Menu