कुक्कुटपालनाला वादळाचा फटका

तौक्ते चक्रीवादळाचा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसला असून मांगरावर पडलेल्या आंब्याच्या झाडामुळे सुमारे १००० कोंबडीची पिल्ले मृत झाली. कोंबड्यांचे खाद्यही वाया गेले असून मांगराचीही पडझड झाल्याने कृष्णा राऊळ यांचे अंदाजित ३ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

      वेंगुर्ला-राऊळवाडा येथे कृष्णा राऊळ यांचा कुक्कुटपालन व्यवसाय असून तौक्ते चक्रीवादळात कोंबडीची पिल्ले असलेल्या मांगरावर आंब्याचे झाड पडल्याने मांगराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तर मांगरामध्ये असलेली सुमारे १००० कोंबडीची पिल्ले मृत झाली. तसेच त्यांचे खाद्यही वाया गेले आहे. या सर्वात त्यांचे ३ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Close Menu