किरातच्या कथा लेखन स्पर्धेत सरिता पवार प्रथम

         पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष असून यावर्षीही स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ व वीरधवल परब, वेंगुर्ला यांनी केले आहे. यात प्रथम- सरिता पवार, कणकवली, द्वितीय- प्राजक्ता आपटे, वेंगुर्ला, तृतीय- अमृता दळवी, कणकवली, चतुर्थ- मृणालिनी देसाई, धामापूर, पाचवा- मधुरा तिळवे, सांगली (वेंगुर्ला),  सहावा-वैशाली मठकर, डोंबिवली (वेंगुर्ला)

      या स्पर्धेतील 1 ते 6 क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरात दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रकमेसहीत अरुण सावळेकर लिखीत नाट्यरंग या दीर्घांकीकेची प्रत भेट म्हणून दिवाळी अंकासोबत दिली जाणार आहे. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे किरात परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu