प्रदूषण आणि दिशाभूल करणाऱ्या आंब्याच्या बागा

‘नुकताच एक मराठी पेजवर जामनगर येथील रिफायनरी क्षेत्रात तब्बल दीड लाख आंब्याची आमराई रिफायनरीने फुलवली असल्याबाबत लेख आला. तिथे आंब्याचे भरघोस उत्पन्न कंपनी घेत असून जामनगर येथील रिफायनरीमधून कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा आमराईवर जराही परिणाम होत नाही किंबहुना रिफायनरी अजिबात प्रदूषण करणाऱ्या नसतात असे भासविण्याचा प्रयत्न लेखातून होतो आहे अशी शंका आली. सदर लेखात येथील रिफायनरीने अगदी विपरीत परिस्थितीत शेती करून दाखवली आहे. जिथे प्यायला पाणी नाही तिथे एवढ्या मोठ्या आमराईसाठी पाणी कुठून आणायचं म्हणून कंपनीने समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून (desalination) आमराई वाढवली आहे आणि प्रदूषणकारी कंपनी आणि तिथेच शेती ह्या दोन टोकाच्या गोष्टी सहज शक्य आहेत असे भासाविण्याचा प्रयत्न केला आहे.’

      त्या मागचं सत्य काय आहे हे आता समजून घेऊ. हे खरं आहे की, सदर रिफायनरीच्या अगदी जवळ तब्बल दीड लाख आंब्याची झाडे कंपनीने लावली आहेत. पण त्यावर प्रदूषणाचा काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी खोटं ठरेल. कारण, ही आमराई रिफायनरीच्या चिमणीपासून 7 किमी उत्तरे जवळ बनवण्यात आली आहे. इथेच फार मोठी गोम आहे. कारण, कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाचा प्रभाव चिमणीच्या अगदी जवळ म्हणजे पाच ते सात किमी अंतरावर होतच नाही.

          कारण, चिमणीमधून निघणारे घातक वायू जे तुलनेने खूपच हलके असतात ते कधीच चिमणीच्या खाली वसलेल्या क्षेत्रावर पडत नाहीत ते उंचावर फेकले जातात. आणि उंचावरून वाहणारी हवा त्यांना दूर घेऊन जाते आणि रिफायनरी क्षेत्रात कुठेच प्रदूषणाचा परिणाम दिसत नाही. परंतु, रिफायनरी क्षेत्रा पासून वीस ते पन्नास किमी अंतरावर त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो.

      आत्ता आणखी एक महत्वाची गोष्ट कंपनीने केली आहे ती म्हणजे चिमणीपासून आमराई ही तब्बल सात किमी उत्तरेला आहे. (ही बाब ज्या लेखाचा मी उल्लेख करत आहे त्यात खोटी लिहिली असून सदर बागायत रिफायनरीच्या पश्चिम दिशेला आहे असे लिहिलं आहे.) समुद्राजवळ हवा रात्री जमिनीकडून समुद्राकडे आणि सकाळी समुद्राकडून जमिनीकडे वाहते. म्हणजेच पूर्व पश्चिम असा हवेचा प्रवास आहे. त्यामुळे चिमणी पासून उत्तरेला असलेल्या आमराईकडे चिमणीतून निघालेला धूर पोहोचतच नाही तो आमराईच्यामागील बाजूस पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करतो.

        तसेच, ऋतू बदल झाल्यावर देखील उन्हाळी मान्सून वारे पश्चिम नैऋत्याकडून पूर्व ईशान्य दिशेला वाहतात तर हिवाळी मान्सून (परतीचा पाऊस) हा ईशान्य कडून पश्चिम नैऋत्य दिशेला प्रवास करतो. त्यामुळे रिफायनरीमधून निघणारा धूर कधीच ह्या आमराईमधे जातच नाही. कारण, तो नेहमी आमराईच्याविरुद्ध दिशेला जातो आणि अशा रितीने ही आमराई रिफायनरी क्षेत्रात असून देखील तिच्यावर प्रदूषणाचा अजिबात परिणाम होत नाही.गुगल फोटोमध्ये देखील रिफायनरीच्या चिमणी मधून निघालेले धुराचे लोट देखील उपग्रहांने टिपले असून रिफायनरी मधून उपग्रहवारून देखील प्रदूषण दिसते आहे. तसेच धुराचे लोटआमराईच्या विरुद्ध दिशेला जाताना दिसत आहेत.

    आता आणखीन एक बाब इथे नमूद करावी असं मला वाटतं ती म्हणजे सदर लेखात आमराईसाठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून वापरले जाते असं सांगितलं आहे आणि समुद्राचे पाणी निक्षारिकरण करणे कित्ती सोप्पे आणि फायदेशीर असल्याचे गळी उतरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु, असे करत असताना जेवढे समुद्राचे पाणी निक्षारीकरण केलं जातं त्याच्या दीडपटीने अतिशय क्षार युक्त (ण्न्र्द्रड्ढद्ध द्मठ्ठथ्त्दड्ढ डद्धत्दड्ढ) पाणी तयार होत ज्या सोबत घातक असे क्लोरीन आणि कॉपर युक्त विषारी द्रव्ये देखील तयार होतात जी थेट समुद्रात सोडावी लागतात ज्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीचा विनाश होतो.

    आता वर उल्लेख केल्याप्रमाणे जर १.५ लाख आंब्याच्या झाडांना निक्षरीकरण केलेलं पाणी दररोज दिलं जात असेल तर त्याचा हिशोब मांडल्यास एकट्या आंब्याच्या झाडाला दिवसाला १५० लिटर इतक पाणी लागत. त्या हिशोबाने १.५ लाख आंब्याच्या झाडांना दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी द्यावं लागेल आणि हे पाणी जर निक्षारीकरण केलेलं आहे असं पकडलं तर त्याच्या दीड पटीने अतिशय क्षार युक्त आणि विषारी द्रव्ये तयार झालेलं पाणी जे जवळपास २२.५ दशलक्ष लिटर घातक असे अतिक्षार युक्त पाणी दररोज कुठे टाकले जात असावे हा संशोधनाचा विषय असायला हवा.

   तर सांगायचं तात्पर्य हेच की,अशा दिशाभूल करणा-या आमराईपासून आणि अशा प्रकल्पापासून आपण सावधच राहिलेलं बरं. मूळात या रिफायनरीतून होणा-या प्रदूषणाची माहितीच अपुरी आहे. अपु-या माहितीच्या आधारे या रिफायनरीचे समर्थन कोणीही करू नये. तेथील भूभाग सपाट असल्याने रिफायनरी मधून निघालेला धूर नक्की किती लांब जातो, त्याचा बागायती, जंगल, नद्या, इत्यादी वरती काय परिणाम होतो हे कोणालाच सांगता येणार नाही.

    राहिली गोष्ट सदर मराठी पेजने छापून आणलेल्या लेखाचा दाखला देऊन जर कोणी कोकणात रिफायनरीच समर्थन करीत असेल तर एक अति महत्त्वाची बाब म्हणजे ‘कोकणात सह्याद्रीच्या पश्चिम दिशेला जिथून मान्सून येतो त्या बाजूस रिफायनरी उभी केली तर तिचा खूप वाईट परिणाम संपूर्ण सह्याद्रीवरती होईल रिफायनरीतून निघालेले धुराचे लोट दररोज सकाळी पश्चिम दिशेकडून पूर्वेस वाहणा-या हवेमुळे पूर्वे जवळ असणा-या डोंगराळ भागात जातील. (जामनगर येथे भूभाग डोंगराळ नाही त्या मुळे धुराचे लोट डोंगराळ भागात अडले जात नाहीत.) त्यामुळे पूर्व नियोजित नाणार येथे किवा बारसू सोलगाव येथे जर रिफायनरी उभी राहिली तर त्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात असलेल्या डोंगराळ भागातील जंगल आणि गावं रिफायनरीमधून आलेल्या प्रदूषणाला बळी पडणार हे निश्चित. तसेच मान्सून वेळी, पश्चिम नेऋत्य दिशेने वाहणा-या वा-यामुळे रिफायनरीमधून निघालेले धुराचे लोट कित्येक किलोमिटर उत्तर पूर्व दिशेला असलेल्या गावांमध्ये आणि समुद्राच्या पूर्वेला उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वतावर जातील. ज्यामुळे त्यावर उभ्या असलेल्या वनराजाला व त्यात राहत असलेल्या माणसा सहित कित्येक जीवांना त्याची भयंकर किंमत मोजावी लागेल. त्याच सोबत जेव्हा मान्सून येईल तेव्हा ढगांच्या सोबत वाफेमधे रिफायनरीमधून निघालेल्या विषारी वायूचे लोट यांचे संयुग होऊन पावसा सोबत खाली येतील आणि मग कोकणातील सर्व जमिन आणि नद्या देखील त्याची किंमत मोजतील आणि विषाक्त होऊन माणसाला त्याच्या करणीचे फळ देतील.    

       -प्रा.भूषण भोईर, ८२३७१५०५२३.

 

 

 

Leave a Reply

Close Menu