
वेंगुर्ल्यातील शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय हा बहुमान मिळाला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाने ही निवड केली आहे.
सन 1975 मध्ये शिक्षणमहष प्राचार्य एम. आर. देसाई आणि संसदपटू बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकरी, मच्छीमार कामगार व वंचित घटकांना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्याचा संकल्प या संस्थेने केला. 1961 मध्ये वेंगुर्ल्यात महाविद्यालयाची स्थापना झाली. पुढे 1965 मध्ये संस्थापक बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले. त्या काळात कोकणात उच्च शिक्षण दुमळ होते. मात्र या महाविद्यालयामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची नवी संधी मिळाली.
सध्या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये विद्याथ शिक्षण घेत आहेत. प्रयोगशाळा, संगणक केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, मुलींसाठी सुरक्षित वसतिगृह, तसेच करिअर कॉन्सेलिंग सेंटर अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. महाविद्यालयाने वेळोवेळी अभ्यासक्रमात नवनवीन बदल स्वीकारले. पदवी शिक्षणासोबतच इको टुरिझम कोर्स, ग्रीन नेचर क्लब, महिला विकास कक्ष, ॲड-ऑन कोर्सेस याद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवले जाते.
महाविद्यालयातील एनसीसी युनिट विद्यार्र्थ्यांमध्ये शिस्त, संघटन कौशल्य आणि राष्ट्रनिष्ठा रुजवत आहे. माजी कॅडेटस् भारतीय सैन्य, पोलीस सेवा आणि सरकारी सेवेत दाखल झाले असून त्यांच्या यशाने महाविद्यालयाचे नाव उजळले आहे. महाविद्यालयातील एनएसएस विभाग हा संस्थेच्या सामाजिक योगदानाचा प्रखर पुरावा आहे. गेल्या दशकात एनएसएस स्वयंसेवकांनी ग्रामीण स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, गाव विकास योजना, महिला सबलीकरण कार्यशाळा, डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांत सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, वेंगुर्ले नगरपालिकेसोबत राबविलेल्या स्वच्छता मोहिमा तसेच वेटलँड दस्ताऐवजीकरण प्रकल्प यामध्ये एनएसएस विद्यार्थ्यांची उपस्थिती ठळक राहिली. ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनासाठी या स्वयंसेवकानी केलेले प्रयत्न विद्यापीठानेही गौरवले आहेत.
खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांची भूमिका विशेषत्वाने अधोरेखित करावी लागेल. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्याथ संस्थेशी कायम जोडलेले आहेत. त्यांनी शिष्यवृत्ती निधी निर्माण केला, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली, करिअर मार्गदर्शन व्याख्याने घेतली तसेच प्रयोगशाळा व ग्रंथालयासाठी उपकरणे व पुस्तके उपलब्ध करून दिली. काही माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्याख्याने देऊन तरुण पिढीला प्रोत्साहित केले.
प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी म्हणाले की, आज आपण मिळवलेला पुरस्कार हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या केवळ परिश्रमाचे नव्हे तर आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणा व सहकार्याचेही फलित आहे. महाविद्यालय केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. येथे बॅ. बाळासाहेब खर्डेकर स्मृती इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, माजी विद्याथ आयोजित प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा, आंतरवगय शरीरसौष्ठव स्पर्धा, वार्षिक सांस्कृतिक महोत्सव या परंपरा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवतात. लोककला व कोकणी संस्कृती जपण्यासाठी महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले आहेत.
राष्ट्रीय मुल्यांकन परिषदेच्या (नॅक) तिसऱ्या चक्रात महाविद्यालयाने CGPA 3.23 सह ‘A’ ग्रेड मिळवली. हा दर्जा मिळवताना शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, विद्याथ सेवा आणि समाजाभिमुख उपक्रम यांचा मोठा वाटा होता. आता मुंबई विद्यापीठाने दिलेला सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय पुरस्कार हा त्या यशाला अधिक तेजस्वी मुकुट ठरला आहे.
मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आहे. विद्यमान या कामगिरीमागे शिक्षण प्रसारक अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कॉन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासकीय अधिकारी पृथ्वी मोरे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. सोमवार 15 सप्टेंबर रोजी ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, कलिना कैम्पस, मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ (पूर्व) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
