लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची शोकांतिका!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता, की जी सामाजिक सुधारणांचा पाया ठरते. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणा­या महाराष्ट्राला थोर पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. त्याचा उगम प्रामुख्याने झाला तो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रगल्भ लेखणीतून. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला…

0 Comments

मु. पो. कुबलचाळ, ता. वेंगुर्ला

मध्यरात्री अचानक भिंतीवरील घड्याळ भिंतीवरुन खाली पडण्याचा आवाज आणि माझा घाबरुन ओरडल्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे जागी झाली. मला काही लागलं नाही याची खात्री करत, घडाळ्याच्या काचा एकत्र करून सर्व साफसफाई झाल्याची खात्री झाल्यानंतर अस्मादिकांसह सर्वजण पुन्हा निद्रेच्या अधीन झालो. नक्की वर्ष…

0 Comments

हे थांबवा….

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाल्याच्या दोन घटना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्या. विशेष म्हणजे त्यातील एक घटना चक्क वेंगुर्ल्यात घडली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती किशोरवयीन तरुणी आहे, हे आणखीनच आश्‍चर्यकारक.       आमचं वेंगुर्ला असं जातीय किंवा धार्मिक दुहीचं नाहीच मुळी.…

0 Comments

“अयोध्या” एक विलक्षण नाट्यानुभव 

 केदार देसाई लिखित दिग्दर्शित “अयोध्या“...भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध ह्या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग ‘याची देही याचि डोळा’ पहाण्याची संधी वेंगुर्लेवासीयांना लाभली.                   केदार देसाई नाव उच्चारले की, रंगमंचावर नवनवीन संकल्पना पाहायला मिळणार याची खात्री रसिक प्रेक्षकांना…

0 Comments

पालकांसमोरची नवी आव्हाने

न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही।       मानसशास्त्र या विषया सोबत काम करताना साधारणपणे कोविड नंतरच्या काळापासून पालक आणि पाल्य या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव ही वारंवार जाणवणारी समस्या वाटते आहे. समाज माध्यमांचा अविवेकी वापर विद्यार्थ्यांकडून वाढला असल्यामुळे…

0 Comments

आमचे पबीकाका

शिर्षक वाचताना मराठी निबंध असावा बहुदा असंच वाटेल आपल्याला. पण हो, म्हणावा तर निबंध म्हणावं तर व्यक्त होणं. तेही आपल्या सर्वांच्याच पबीकाकांद्दल. पबीकाका म्हण्णजे श्री. प्रभाकर नागेश नाईक. या 10 जानेवारी रोजी पबीकाका वयाची 75 री पूर्ण करीत आहेत. यानिमित्त हा छोटासा लेखन…

0 Comments

देवाचीये द्वारी उभा क्षणभरी

       कोकणात मंदिर संस्कृती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे. येथील घराघरांत धार्मिकतेचा प्रभाव दिसून येतो. इतर हिदूंचे सण साजरे करण्याबरोबरच येथील मंदिरांमधील उत्सव तेवढ्याच भक्तिभावाने साजरा करण्यात कोकणातील माणसांचा पुढाकार असतो. त्यामुळे येथील वातावरण हे नेहमीच भक्तिमय दिसून येते. दिवाळी संपून गावोगावच्या…

0 Comments

नवांकूर बालकुमार साहित्य संमेलन

मी अनेक वर्षे कुडाळ वेंगुर्ला प्रवास करते आहे. प्रवासात थोड्याच वेळासाठीही भेटणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मी गप्पा करते. अर्थातच बोलता बोलता मी साहित्य या विषयापाशी येते. प्रत्येकवेळी माझ्या मनावर चिंतेचा ओरखडा उमटत राहातो. त्या त्या वेळीच या मुलांसाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असा विचार रूजतो.…

0 Comments

देवदिवाळी – संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

    कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्त्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदा‘ या दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात व धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदिवाळी.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा…

0 Comments

बदलती दिवाळी…आनंद तोच. पण बदलणारा

अनुभव म्हटल्यावर स्वतःच बालपण आलच आणि आपलं बालपण म्हटल्यावर गाव सुद्धा आलं. मग सुरूवात होतेय ती ३० वर्षांपूर्वीच्या गावच्या दिवाळीने! ५-६ वर्षांच वय जेव्हा समज यायला लागलेली.       आमची दिवाळी सुरू व्हायची ती नरक चतुर्दशीलाच, वसुबारस ते धनत्रयोदशी आम्हा स्वधर्मियांना कळायला बराच अवधी…

0 Comments
Close Menu