माझा बाप्पा

सकाळी सकाळीच भूपाळीचे मधूर सुर कानी पडतोय. अगरबत्तीचा दरवळ अवघं घर व्यापून पसरलाय. घरात लगबगीनं कामं चाललीत. ओटा आणि देवघर शेणानं सारवून झालंय. त्याचा निराळाच गंध घरभर पसरलाय. देवघरातून येत असणारा समईचा मंद प्रकाश देवत्त्वाची चाहूल देवून जातोय. मग मध्येच वाटतंय, की पांघरुण…

0 Comments

EIA २०२० आले तर आपले काय होणार?

मच्छिमारांमध्ये चितेचे वातावरण      केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेला ‘एनव्हार्मेंट इम्पक्ट असेससेंट नोटिफिकेशन २०२०‘ अर्थात ‘पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना २०२०‘ हा मसुदा सध्या चर्चेत आहे. देशभरातील लाखो पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेली नॅशनल फिशवर्कर्स फोरम संघटना तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि विविध मच्छीमार…

0 Comments

विघ्नहर्त्याच्या आगमनाची पूर्वतयारी

कोरोनासारख्या महामारीचे ‘विघ्न‘ समोर असतानाही ‘विघ्नहर्त्या‘च्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तीकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी ‘विघ्नहर्त्या‘चे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे.     गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. यानिमित्ताने…

0 Comments

धयकालो…

नागपंचमी झाली की कोकणात अष्टमीचे वेध सुरु होतात. मुंबईमध्ये गोकुळाष्टमीचे मुख्य आकर्षण असते ते दहीहंडीचे. नाक्या नाक्यावर उंचच उच थर लाऊन दहीहंडी साजरी केली जाते. सर्व रस्ते त्या दिवशी गर्दीने फुलून जातात. मला आठवतय शासकीय सेवेत हजर झाल्यावर सुरुवातीला मुंबईत दहीहंडीची सुट्टी नसायची.…

0 Comments

नाते शब्दांपलीकडचे…

हिंदू धर्मामध्ये श्रावणातल्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जातो. बहिण-भाऊ हे आयुष्यातलं एक अतूट नातं... या नात्याची महती सांगणारा हा सण देशभर संपन्न होतो. खूप भावनिक परंतू जिव्हाळ्याचं असणारं हे नातं सर्वांच्या जीवनात एक प्रेमाचं नंदनवन फुलवतं. आजतागायत संगीत क्षेत्रात काम करीत…

1 Comment

नागोबा आणि पंगा-याच्या पानातले पातेाळे….

अंगणात हिरव्यागार उगवलेल्या टायकाळ्यावर भिरभिरणा-या पिवळ्या फुलपाखरांच्या मागे पळत असताना नजर मात्र आईच्या वाटेकडे लागली होती. एवढ्यात चार घरची भांडीकुंडी करुन दुपारच्या वेळी आई लगबगीने घरी येताना दिसली. भिंगरीला दो-याने बांधून तीचे हॅलीकॉप्टर घेऊन ती तसाच आईच्या दिशेन झेपावलो. आईला बिलगून बोललो “आये…

0 Comments

*लॉकडाऊन – याला जीवन ऐसे नाव*

           करोना आणि त्याच्या अनुषंगाने आलेला लॉकडाऊन यानी जीवनात आमुलाग्र बदल केलाय असं म्हंटलं तर वावग ठरणार नाही. पण निसर्गाकडे पाहिल्यावर आपल्याला समजतं की सुर्यास्तानंतर सुर्योदय नक्की! अशा संकटकाळी जर आपण आपल्या विचारांची दिशा बदलली, जास्तीत जास्त सकारात्मक विचार…

0 Comments

विवेकाची पेठ

           जगभर लोक वारकऱ्यांचे अभिनंदन, कौतुक करत आहेत. पंढरीनाथही मनापासून आपल्या लेकरांचे कौतुक करत असेल. आम्ही मनापासून वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. करोनाच्या अचानक उद्भवलेल्या, भयानक वेगाने पसरणाऱ्या, सांसर्गजन्य आजाराच्या जागतीक संकटात पंढरीची पायी आषाढी वारी व विठुरायाचे दर्शन करता…

0 Comments

लाॅकडाऊन…

         पावसाळा हा खरोखरच सृजनाचा सोहळा असतो.मेघांनी आपलं दान मातीत ओतल्यावर अंकुराचे सृजन होते. वर्षा ऋतू, नटलेली सृष्टी, इंद्रधनुची कमान, मृदगंध, खळखळणारे झरे, पावसासोबत कोसळणार्‍या आठवांच्या सरी, मनाच्या कुपीत जपलेले असंख्य बरे वाईट क्षण अशा अनेक गोष्टींना धुमारे फुटतात आणि…

0 Comments

शिक्षणाचं असं करता येईल काय?

विषय अर्थातच शिक्षणाचा. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही. तरीही शिक्षण हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि म्हणूनच सद्यपरिस्थितीत काळजीचा विषय  जी व्यक्ती किंवा वस्तू किंवा गोष्ट अत्यंत जिव्हाळ्याची असते, तिचीच काळजी आपल्याला जास्त असते, तसं काहीतरी माझं शिक्षणाच्या बाबतीत होतं. सध्या शिक्षणाचा जो खेळ…

0 Comments
Close Menu