पत्रकार समितीतर्फे समुद्राला नारळ अर्पण

वेंगुर्ल्यात गुरुवारी नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरीकांबरोबरच येथील पोलिस स्टेशनपत्रकार समितीलोकप्रतिनिधी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. दरम्यानतालुका पत्रकार समितीच्यावतीने अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी नारळाची विधीवत पूजा करुन समुद्राला अर्पण केला.

      यावेळी पत्रकार समितीचे उपाध्यक्ष के.जी.गावडेसचिव अजित राऊळजिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष दाजी नाईकसदस्य दिपेश परबतालुका पत्रकार समितीचे सदस्य भरत सातोस्करप्रथमेश गुरवविनायक वारंगअजय गडेकर आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंदर येथे नारळी पौर्णिमा साजरी केली.

Leave a Reply

Close Menu