सध्या शेतीच्या बाबतीत तंत्रज्ञान विकसित होऊन आधुनिकीकरण झाले आहे. शेती करत असताना कोकण कृषी विद्यापीठाने जे मार्ग सुचवलेले असतील, त्याचे जे प्रमाण दिले आहे त्या पद्धतीने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. ब-याच ठिकाणी लोक सेंद्रिय शेती, भाजीपाला याकडे वळायला लागली आहेत. यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन शेतक-यांनी शेती करावी असे आवाहन वेंगुर्ला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले.
पंचायत समिती वेंगुर्ला, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत अणसूर यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी अणसूर-पाल हायस्कूल येथे कृषि दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यापिठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, मंडळ कृषी अधिकारी शंकर नाईक, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, आरवली सरपंच समीर कांबळी, आसोली सरपंच बाळा जाधव, मुख्याध्यापक राजेश घाटवळ आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी शेतकरी व वारकरी यांच्या पेहरावात काढलेल्या वृक्षदिडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून हळद लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. तालुकास्तरावर घेतलेल्या भातपीक स्पर्धेतील विजेते सुशांत नाईक (वेतोरे), अश्विनकुमार मांजरेकर (तळेकरवाडी), प्रमोद गावडे (अणसूर) यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेचप्रगतशील शेतकरी, आंबा बागायतदार बाबू जयराम गावडे यांचा व गांडूळ खत निर्मिती करून विक्री करणा-या तसेच शेतीविषयक विविध उपक्रम राबवणा-या माऊली उत्पादक समूह गट (अणसूर) या कृषी उत्पादक गटाचा आणि रानभाज्या प्रदर्शनात सहभागी महिलांचा सत्कार करण्यात आला.
प्रादेशीक फळ संशोधन केंद्राचे काजू शास्त्रज्ज्ञ डॉ. ललित खापरे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम, जिल्हा संसाधनच्या श्रेया सामंत, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आनंद जानकर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई अध्यक्ष आत्माराम गावडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र गावडे, अणसुर उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रा.पं.सदस्य वामन गावडे, सुधाकर गावडे, सीमा गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, ग्रामपंचायत अधिकारी डी.बी.पवार, पाल उपसरपंच प्रिती गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी यांच्यासह पंचायत समिती कृषी विभाग, तालुका कृषी विभागचे अधिकारी कर्मचारी, विविध ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी, अणसुर-पाल हायस्कूलचे शिक्षक, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, महिला वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी, कृषी विस्तार अधिकारी सखाराम सावंत, सुप्रिया कोरगावकर यांनी सुपारीचे रोप देऊन मान्यवरांचे स्वागत केले.