आंबा-काजू बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील आंबा, काजू उत्पादक शेतक-यांची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये अध्यक्ष-जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्ष-दिव्या वायंगणकर, सचिव-अॅड.प्रकाश बोवलेकर, सहसचिव-सान्वी नेमण, खजिनदार-विरेंद्र आडारकर, सदस्य-दादा म्हाळवणकर, शिवराम आरोलकर, चेतन कुबल, ललितकुमार ठाकूर, विजय सरमळकर, बळीराम प्रभूतेंडोलकर, सुरेश धुरी, अनिल मांजरेकर, किशोर नरसुले, जगन्नाथ मांजरेकर, रत्नदीप धुरी, बाळा देसाई यांचा समावेश आहे. आंबा कॅनिगला ३५ रुपये किलो भाव मिळावा यासाठी शासन आणि कॅनिग प्रोसेस युनिटधारक यांच्याशी चर्चा करणे, किटक नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करूनही रिझल्ट मिळत नाहीत, यासाठी किटकनाशके विक्रेते, कृषी अधिकारी यांच्या सोबत चर्चा करणे, काजूला १६० रुपये हमी भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि चारही तालुक्यात येत्या वर्षभरात संघाचे किमान १० हजार सभासद करण्याचे ठरविण्यात आले.