सिंधुदुर्गात समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणा-या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता रिमोटद्वारे वाचविण्यासाठी पुणे येथील एका कंपनीने (रिमोट काफ्र्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट) ‘दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र‘ बनविले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या यंत्राबाबत प्रात्यक्षिक बघून सविस्तर माहिती आपल्याला द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिली होती. त्यानुसार भूषण चिंचोले (पुणे) यांनी नवाबाग समुद्रात या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तहसीलदार ओंकार ओतारी, सरपंच निलेश चमणकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, तलाठी सायली आंदुर्लेकर, भाजप वेंगुर्ल अध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तसेच पोलीस पाटील, कोतवाल, नागरिक उपस्थित होते.
यावेळी रिमोटवर चालणा-या या यंत्राचे प्रात्यक्षिक बघितल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्याचा स्वतः वापर करून प्रात्यक्षिक केले आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. हे यंत्र समुद्रात दीड किलोमीटरपर्यंत बुडणाया व्यक्तीपर्यंत जाऊ शकते. एकावेळी तीन व्यक्तींना समुद्राच्या पाण्यावर आपल्या सोबत तरंगत ठेवू शकते. तसेच एक व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीला तरंगत पकडून किनायापर्यंत आणू शकते.