समाजाला अहिल्याबाईंच्या विचारांची गरज!

भाजपा सिधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला येथील कालेलकर हॉलमध्ये अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष माहिती देणा­या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन भाजपाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर, श्वेता कोरगावकर, प्रसन्ना देसाई, महेश सारंग, पपू परब, सुहास गवंडळकर, राजन गिरप, प्रशांत आपटे, राजू राऊळ, साईप्रसाद नाईक, सुषमा खानोलकर, सुजाता पडवळ, स्मिता दामले, शितल आंगचेकर तसेच पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

      अहिल्याबाई होळकर या केवळ एका राज्याच्या राणी नव्हत्या, तर त्या एक दूरदर्शी प्रशासक, स्त्री शक्तीचा भक्कम आधार आणि समाजसुधारणेच्या प्रखर प्रेरणा होत्या. त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन  रविद्र चव्हाण यांनी केले.  या प्रदर्शनाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील प्रमुख टप्प्यांचे, कार्याची दिशा दाखवणारे चित्रफलक, माहितीपटल सादरीकरण करण्यात आले. महिला, विद्यार्थी, नागरिक यांचा या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी केले. आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu