‘जिल्हा बँकांसमोर आव्हान‘ यावर मार्गदर्शन

ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे ‘जिल्हा बँकांसमोर आव्हान‘ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ठाणे जनता सहकारी  बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष  मनिष दळवी, बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा ढवण, नीता राणे, रविद्र मडगांवकर, समीर सावंत, दिलीप रावराणे, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाद धुरी आदींसह संचालक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.                                        

    सध्याच्या राष्ट्रीयकृत बँकाच्या असलेल्या तीव्र स्पर्धेच्या काळात जिल्हा बँकांसमोर विविध आव्हाने असून त्याला सामोरे जाण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरुन त्यावर मात केली पाहिजे. आपण छोटे आहोत हा विचार न करता ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल याचा विचार प्रकर्षांने करणे गरजेचे असून कार्पोरेट व राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा करीत असताना जिल्हा बँकांची ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते ही जिल्हा बँकांची जमेची बाजू असून त्याचा वापर व्यवसाय वाढीसाठी करायला हवा असे मत शरद गांगल यांनी व्यक्त केले.

   ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार सेवा देण्याची विद्यमान संचालक मंडळाची भूमिका राहिलेली आहे. जिल्हा बँकेच्या बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब जोडले गेले आहे. दिवसागणिक आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जे काही बदल होत आहेत ते बदल स्वीकारण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, असे मत मनिष दळवी यांनी व्यक्त केले. अतुल काळसेकर म्हणाले की, सिधुदुर्ग हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत आकाराने लहान असला तरी गेल्या २ वर्षात आपण जी प्रगती केली ती निश्चित कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Close Menu