वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. रुपाली मोकाशी-पाटील यांनी २३व्या वर्षी संसार स्थिरस्थावर झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला.
बारावी परीक्षेत कला शाखेतून सर्व विषय घेऊन ६५० पैकी ५६० (८६.१५ टक्के) गुण मिळवित प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. स्वतःची जिद्द असेल आणि घरच्यांचा पाठींबा असेल तर तुम्ही सहज एखादी इच्छा पूर्ण करु शकता. मला एवढ्यावरच थांबायचे नाही तर सर्वांच्या प्रोत्साहनामुळे वकिलीचेही शिक्षण घेणार असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले.