‘मातृभूमीला नमन वीरांना वंदन‘ अंतर्गत देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये 14 ऑगस्ट रोजी शिलाफलकाचे अनावरण मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे वारसदार विजय गुरव व विलास पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला दिलीप गिरप, बाळू देसाई, प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर यांच्यासह शहरातील व्यापारी, भाजी व फळ विक्रेते, नागरिक व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.