एम.ए.अभ्यासक्रमात ‘बाया पाण्याशीच बोलतात‘

कणकवली येथील प्रसिद्ध कवी आणि दै. तरुण भारतचे पत्रकार अजय कांडर यांच्या ‘बाया पाण्याशीच बोलतात‘ या कवितेचा मुंबई सोमय्या महाविद्यालयाच्या (महाविद्यालयाचा स्वतंत्र विद्यापीठ अभ्यासक्रम) एम.ए. द्वितीय सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या कवितेचा मुंबई विद्यापिठ व सोलापूर विद्यापिठ प्रथम वर्ष कला, मुंबई विद्यापिठ बालभारती इ.९वीच्या पाठ्यपुस्तकात समावेश झाला आहे. ग्रामीण भागातील महिलांचे पाण्याशी असलेल्या नात्याचे वर्णन या कवितेमध्ये आहे. यापूर्वी त्यांच्या विविध कविता अमरावती विद्यापिठ एम.ए., बॅचलर ऑफ मास व द्वितीय वर्ष कला मुंबई विद्यापिठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगांव अभ्यासक्रमात घेतल्या आहेत. या कवितांचे उर्दु, मल्याळम, हिदी, इंग्रजी, कन्नड असे अनुवादही झाले आहेत.

Leave a Reply

Close Menu