तुलसी विवाहाला प्रारंभ

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात शुक्रवारपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी रात्रौ उशिरापर्यंत घरोघरी तुलसी विवाह  समारंभ सुरू होते.  कार्तिक शुद्ध द्वादशीला घरासमोरील असणा-या तुलसी वृंदावनाचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्यानुसार शुक्रवारपासून विवाह समारंभ सुरू झाले आहेत. दुपारपासूनच ठिकठिकाणी मंगलाष्टका ऐकू येत होत्या. सोमवारपर्यंत तुलसी विवाह समारंभ चालणार आहेत. यावेळी प्रसाद म्हणून कुरमुरे वाटण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तुलसी विवाहाला अवकाळी पावसाने हजेरी लावली. काहीकाळ हा पाऊस लागल्याने पुढे तुलसी विवाह निर्विघ्न पार पडले.

Leave a Reply

Close Menu