गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गचा स्नेहमेळावा व वधुवर मेळावा संपन्न

     गौड सारस्वत समाज वेंगुर्ला उपसमितीने स्वामिनी मंगल कार्यालयात आयोजित केलेला गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गचा स्नेहमेळावा व वधुवर मेळावा समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत संपन्न झाला. उद्घाटन गौड सारस्वत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर, विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे प्रा.विनायक राजाध्यक्ष, सारस्वत समाज सांगलीचे अध्यक्ष डॉ. विकास कोटणीस, सारस्वत विकास मंडळ कोल्हापूरचे माजी विश्वस्त शरद प्रभावळकर, जिल्हा उपाध्यक्ष रघुवीर उर्फ भाई मंत्री, सचिव संतोष पई, संस्थापक कार्यवाह राजस रेगे आदी उपस्थित होते.

            गौड सारस्वत समाजाला कोणत्याच आरक्षणाची गरज नाही. आपण आरक्षण न घेता तुम्ही दुस­यांना नोकरी देणारे उद्योजक बना असे आवाहन विनायक राजाध्यक्ष यांनी केले. या स्नेहमेळाव्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञातीतील विशेष उल्लेखनीय कार्य करणा­या व्यक्ती डॉ.मालविका झांटये (मालवण), कु.वैष्णवी प्रभू, कु. ममता प्रभू (आजगांव), अंकित प्रभू-झांटये (आजगांव), अजय प्रभू-खानोलकर (वेंगुर्ला), प्रथमेश नाडकर्णी (कणकवली), अवधुत नाईक (वायंगणी), आशुतोष कुलकर्ण (कुडाळ), मंगेश माणगावकर (होडावडे), राजश्री परूळेकर (तुळस) यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सारस्वत मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेले सारस्वत सामाजातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले जि.प.चे माजी सभापती प्रमोद कामत व वेंगुर्ला तालुका सारस्वत मित्र पुरस्कारासाठी निवड झालेले राज्य परिवहन मंडळात वाहतुक नियंत्रक पदावरून सेवानिवृत्त झालेले न्हैचीआड येथील प्रकाश रेगे या दोघांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. सुनिल सौदागर, डॉ.विकास कोटणीस, शरद प्रभावळकर, रघुवीर मंत्री, चंद्रकांत नाडकर्ण, सत्कारमूर्ती प्रमोद कामत, प्रकाश रेगे, डॉ.मालविका झांटये व तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ यांनी मनोगते व्यक्त केली. वेंगुर्ला उपसमितीचे सदस्य सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांनी मेळाव्यास दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. दुपारच्या सत्रात घेतलेल्या वधु-वर मेळाव्यामध्ये  ज्ञातीतील अनेक वधु-वरांनी आपली नोंदणी केली. या मेळाव्यास सुमारे ५५० ज्ञातीबांधव उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी सुधीर झांटये, दिगंबर नाईक, अमोल खानोलकर, प्रकाश रेगे, जनार्दन शेटये, सिमा नाईक, राखी दाभोलकर, डॉ.प्रसाद साळगांवकर, तृप्ती आरोसकर, सुषमा प्रभू-खानोलकर, स्वाती पोतनीस, अमृता पाडगांवकर, स्मिता नाबर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक अमोल आरोसकर, सुत्रसंचालन संजय पूनाळेकर यांनी तर आभार अमोल प्रभू-झांटये यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu