‘त्या‘ खून्याला कठोर शिक्षा द्या!

मठ येथील कु. सायली गावडे हिचा २८ ऑगस्ट रोजी गोविद माधव याने निर्घुण खून केला. ही घटना निदनीय असून याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. अशाप्रकारच्या घडलेल्या घटनेमुळे समाजातील मुले व महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गुन्हेगारांना मोकाट न सोडता त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी. तसेच त्यांना जामिनीही मंजूर करता नये. सायलीच्या मृत्यूने तिचे आई, वडील, काका, काकी, भाऊ, आजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांचे पैशाच्या स्वरुपात कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे सायली गावडे हिचा खून करणा-या तिच्या मैत्रिणीचा पती गोविद उर्फ वैभव दाजी माधव याला जास्तीत जास्त कठोर (आजन्म कारावास किवा मृत्यूदंड) शिक्षा देण्याच्या दृष्टीने सखोल तपास करुन जास्तीत जास्त पुरावे जमा करावेत. तसेच शिक्षा देण्यासाठी याचा प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्यात यावा. त्याला झालेली शिक्षा ही तिला मिळालेली श्रद्धांजली समजली जाईल. तरी सायली गावडे हिच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी मठ गावातील प्रेरणा महिला ग्रामसंघाने निवेदनाद्वारे वेंगुर्ला पोलिसांकडे केली आहे. निवेदन सादरकरतेवेळी प्रेरणा महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित हत्या. 

Leave a Reply

Close Menu