पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. सलग तिस-यावर्षी घेतलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. यात प्रथम- अमृता अरविद दळवी (कणकवली), द्वितीय- सचिन अनिल मणेरीकर (दोडामार्ग), तृतीय- प्रसाद अनंत खानोलकर (पिगुळी), चतुर्थ- प्रितम श्रीपाद ओगले (वेंगुर्ला), पाचवा- प्रज्ञा अशोक काकतकर (कुडाळ), सहावा-प्रदिप केळुसकर (कुडाळ) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक वीरधवल परब, महेश बोवलेकर व प्राजक्ता आपटे यांनी केले. या स्पर्धेतील १ ते ६ क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरात दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रक्कमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे किरात परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.