पत्रकारांचे कौतुक करावे तेवढेच कमी – दिलीप गिरप

वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे पपू परब, भाजपा युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, दिलीप परब, मारुती दोडशानट्टी, वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, सदस्य दिपेश परब, वेंगुर्ला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर, योगेश तांडेल, भरत सातोस्कर, सचिव विनायक वारंग, किरातच्या संपादक सिमा मराठे आदी उपस्थित होते.  प्रशासन आणि नागरिक यांच्यातील मधला दुवा म्हणजे पत्रकार होय. सामान्य नागरिकांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम पत्रकार करत असताना पत्रकारांना कोणच मने न दुखवता दोन्ही बाजूंचा समतोल राखून त्यांना पत्रकारिता करावी लागते. तसेच शासन लोकप्रतिनिधी यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात. लेखणीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचत असतात. त्यामुळे पत्रकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे मत दिलीप गिरप यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त प्रथमेश गुरव व वेंगुर्ला पत्रकार संघाचा पत्रकार संघाचा स्व. संजय मालवणकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार आदर्श पुरस्कार प्राप्त अजित राऊळ व स्व. अरुण काणेकर स्मृती पुरस्कार प्रदीप सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu