पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या वेंगुर्ला येथील सागर विश्रामगृह या इमारतीची दुरुस्ती व मजबुतीकरण करणे या कामाचा शुभारंभ आज पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांनी नजिकच्या जलबांदेश्वर येथे करण्यात आलेल्या सुशोभिकरण विकासकामाचे उद्घाटनही केले. तसेच यालाच लागून असलेल्या व बांधकाम प्रक्रिया सुरु असलेल्या झुलत्या पुलाची पहाणीही केली.
यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, तहसिलदार प्रविण लोकरे, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, रिलायन्ट बिल्ट अप या कंपनचे ठेकेदार, शिवसेना संफ प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह सेनेचे सचिन वालावलकर, सुकन्या नरसुले, संदेश निकम, सुमन निकम, मंजुश्री आरोलकर, पंकज शिरसाट, सुनिल मोरजकर, नितीन मांजरेकर, निलेश चमणकर, संजय गावडे, मनोहर येरम, सुधाकर राणे आदी उपस्थित होते.