योजना तळागाळापर्यंत पोहचवा – राजन तेली

केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेलअसे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.

      भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंफ अभियान अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा पं.स. मतदारसंघ व वेंगुर्ला शहराचा लाभार्थी मेळावा १२ एप्रिल रोजी येथील साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी आयुष्यमान भारतसुकन्या समृद्धीई श्रम कार्ड आदी योजनेच्या सुमारे २०० लाभार्थींना मोफत कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शरद चव्हाणप्रसन्ना देसाईसुहास गवंडळकरसाईप्रसाद नाईकबाबली वायगणकरसोमनाथ टोमकेशितल आंगचेकरसुषमा प्रभूखानोलकरसुरेंद्र चव्हाणपूनम जाधववसंत तांडेलमनवेल फर्नांडिसदादा केळुसकरपपू परबसारीका काळसेकरश्रेया मयेकरसाक्षी पेडणेकरप्रशांत आपटेधर्मराज कांबळी आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना तेली म्हणाले कीपालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी दिला आहे. तसेच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रिपद असल्याने त्याचा येथील विकासासाठी फायदा होणार आहे.त्यासाठी आवश्यक रस्ते आणि विकासकामांची यादी बनवून ती मंत्री चव्हाण यांच्याकडे द्या. प्रसन्ना देसाई यांनी हे जनसंफ अभियान तालुक्यात प्रभाविपणे राबविले जात असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu