केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.
भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंफ अभियान अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा पं.स. मतदारसंघ व वेंगुर्ला शहराचा लाभार्थी मेळावा १२ एप्रिल रोजी येथील साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी आयुष्यमान भारत, सुकन्या समृद्धी, ई श्रम कार्ड आदी योजनेच्या सुमारे २०० लाभार्थींना मोफत कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, बाबली वायगणकर, सोमनाथ टोमके, शितल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, सुरेंद्र चव्हाण, पूनम जाधव, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, दादा केळुसकर, पपू परब, सारीका काळसेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले की, पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी दिला आहे. तसेच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रिपद असल्याने त्याचा येथील विकासासाठी फायदा होणार आहे.त्यासाठी आवश्यक रस्ते आणि विकासकामांची यादी बनवून ती मंत्री चव्हाण यांच्याकडे द्या. प्रसन्ना देसाई यांनी हे जनसंफ अभियान तालुक्यात प्रभाविपणे राबविले जात असल्याचे सांगितले.