कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील मराठा समाजातर्फे केली असून तसेच निवेदन तहसिलदार ओंकार ओतारी यांच्याकडे सुपूर्द केले. आम्ही सकल मराठा समाज बांधव सुरूवातीपासूनच या मराठा आरक्षण मागणी संदर्भात सक्रियपणे काम केले आहे. अनेक मोर्चात सहभागी होत आम्ही शांततेत अनेकदा मागणी केली आहे. आम्हा मराठा समाजाला पूर्ण खात्री आहे की हे सरकार आमच्या मागणीनुसार कायद्याच्या कसोटीवर कोर्टात टीकणारे असे शाश्वत आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शप्पथ घेत हे सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची जाणीव मराठा समाजाला दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही अभ्यासपूर्ण काम सुरू आहे. त्याला अधिक गती मिळून आरक्षण लवकरात लवकर मिळावे असे निवेदनात नमूद केले आहे.