काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था, व्यापारी यांची ओरोस येथे सभा

जिल्ह्यातील उत्पादित झालेला काजू हा आपल्या जिल्ह्यात राहिला पाहिजे व जिल्ह्यातील कारखानदारांना तो उपलब्ध झाला पाहिजे.आपल्या काजूला एकओळख असून एक विशिष्ट दर्जा,जी आय मानांकन प्राप्त झालेला आहे हा काजू जर केरळ, बेंगलोरमध्ये गेला तर तो मिक्स करून वापरला जाईल व आपल्या काजूची ओळख जाऊ शकते. जिल्ह्यातील काजू जिल्ह्यातच राहिला तर कारखानदारांच्या मार्फत त्यावर प्रोसेस करून त्याचं ब्रॅण्डिंग करता येईल.आपल्या काजूची ओळख निर्माण झाली तर शेतकऱ्यांना 200रू.पर्यंत काजूदर आपण देऊ शकतो.शासन सर्व काही करणार हे ठरवून राहिलो तर यश मिळणार नाही या सगळ्या वाटचालीमध्ये प्रत्येक स्तरावर समस्या असतील. कुठली यंत्रणा स्वतःहून काही आपल्याला मार्ग काढून देणार नाही आपणच यातुन  मार्ग काढला पाहिजे. शेतकरी, विकास संस्था,प्रक्रिया व्यापारी या सर्वांना प्रत्येक स्तरावर आर्थिक दृष्ट्या जो काही पाठिंबा लागेल तो आम्ही उभा करू.आपण असेच एक राहिला तर महाराष्ट्र शासनालाच नव्हे तर केंद्र शासनानलाही हा एक उत्तम पर्याय आपण सगळ्यांनी मिळून उभा करून देऊ शकतो. या सर्व मार्गक्रमणा मध्ये तुमची सगळ्यांची साथ, सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतो असे प्रतिपादन  जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओरोस येथे जिल्हा बँक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केले.

      काजू उत्पादक शेतकऱ्यांची काजू खरेदी करून प्रक्रिया धारकांना पुरवठा करण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सभेचे आयोजन करणात आले होते या सभेस महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद जोशी, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे ,कँश्‍यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे,जिल्हा बँक संचालक गजानन गावडे,जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिक्षीका सौ.उर्मिला यादव, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ.प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्ह्यातील विकास संस्थांचे सचिव,अध्यक्ष तसेच काजू उत्पादक शेतकरी काजू प्रक्रिया कारखानदार, काजू व्यापारी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu