बुरा न मानो होली है,!

            देशात सगळीकडे शिमगोत्सव साजरा केला जात आहे. निरनिराळ्या रंगांची उधळण केली जात आहे, विशेषतः कोकणात याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने राहणारी कोकणी माणसे या शिमगोत्सवाला आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासह…

0 Comments

सत्तावीस वर्षांचे महायुद्ध

      भारतात शाळकरी मुले, भारत देशाचा अत्यंत साचेबद्ध इतिहास शिकतात. शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या ह्या पाठ्यपुस्तकातून भारताचा अभिमानास्पद आणि जाज्वल्य इतिहास वगळण्यात येतो. तो प्रामुख्याने भारताच्या ब्रिटिश साम्राज्याबरोबरच्या लढ्यावर केंद्रीत असतो. म्हणूनच भारतीय उपखंडाचा चेहमोहरा लक्षणीयरित्या बदलणाऱ्या या महायुद्धाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत यात…

0 Comments

कवितेतील स्त्री     

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कवितेतील स्त्री‘ याबाबत विचार करणे उचित ठरेल. स्त्रीविषयक जाणीवा, त्यांच्या भावभावना यांचा प्रामुख्याने विचार केला तर स्त्रियांचे काव्य बहरलेले दिसते.       मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणीवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद…

0 Comments

स्त्रियांच्या सन्मानार्थ…

स्त्रियांप्रती सौजन्य, ऋजुता व सन्मान करण्याच्या प्रवृत्तीला स्त्रीदाक्षिण्य असे संबोधले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत आपली जन्मदाती आई, बहीण व बायको यांचा नेहमीच सन्मान केला जावा, अशी शिकवण प्राचीन काळातील धर्मग्रंथांतून, कथांतून दिली आहे. महिला ही अबला नसून सबला आहे, ती शक्तिरूप मानली आहे.…

0 Comments

पैशाच्या लोभाचे कारण काय..?

अलिकडे होते असे की, मी सतत छोट्यामोठ्या पोस्ट लिहीत असल्याने लोकांना उगीचच असे वाटते की याला बहुधा भरपूर ज्ञान असावे. त्यात आत वयाचे अर्धशतक पूर्ण केल्यामुळे लोकांना मी जेष्ठ वाटू लागलोय. असे त्यांना नुसतेच वाटले असते आणि त्यांनी दुरूनच कौतुक केले असते तर…

0 Comments

निमित्त-बॅ.खर्डेकर स्मृतिदिन

      २६ डिसेंबर २०२४ रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचा ६१वा स्मृतिदिन दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉलेजच्या परिसरात आयोजित केला होता. दरवर्षी एखाद्या मान्यवर व्यक्तीला निमंत्रित करून हा कार्यक्रम सातत्याने होत आला आहे. मात्र या कार्यक्रमासाठी प्रेक्षागृहातील उपस्थिती समाधानकारक नसते हा आजवरचा अनुभव आहे. हे…

0 Comments

राजकीय गुंडांच्या माजाशी कसे लढायचे?    

         संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येबाबत राज्यात हळहळ व्यक्त होताना आता छत्तीसगडमध्ये एका धाडशी संवेदनशील पत्रकार मुकेश चांद्रकर यांची हत्या झाली. एक राजकीय सरपंच होता तर दुसरा पत्रकार. दोघांची राज्य वेगळी होती. हा फरक असला तरी विलक्षण साम्य म्हणजे ठेकेदारी,…

0 Comments

जड्ये चाळ – एक अविभक्त कुटुंब

  ए, आपण रंगीत कोंबड्याची पिल्ले मिळतात त्या पिल्लाचे केलेलं बारस आठवते का? आम्ही मुलांनी काढलेली कावळ्याची प्रेतयात्रा.. आठवतेय? आणि हो, आजोबांचे भिक्षुकीचे सामान घेऊन एक जण पुढे आला आणि त्यांच्या घरात जाऊन ते सामान ठेवलं तेव्हा घराचा दरवाजा नुसताच लोटला होता. घरात…

0 Comments

ते पण अवतार होते!

    मला आठवते, मी त्यावेळी पहिलीत होतो. आम्हाला ख्रिसमसची सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे शेजारच्या प्रविणसोबत खेळण्यासाठी दिवसभर त्याच्याच घरी होतो. संध्याकाळी बाबा शेतातून आले. ते संध्याकाळी माझ्याकडून प्रार्थना म्हणून घेत आणि नंतर पाढे घेत. त्या दिवशी बाबांनी फक्त प्रार्थना घेतली आणि ते एक…

0 Comments

तरच संविधान दिनाचे महत्त्व प्रतिबिंबित होईल!

           नुकताच देशात ७५ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. त्यांनी अथक परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते पूर्ण करण्यात आले व २६ जानेवारी १९५०…

0 Comments