लाचखोर अधिका­-यांची सिस्टीम

आपण रोजच सरकारी दारात उभं राहतो. शासकीय कार्यालये, नगरपालिका, महसूल विभाग, शिक्षण खाते, पोलीस ठाणे. कोणते ना कोणते कागद, मंजुरी, तपासणी किवा प्रमाणपत्रासाठी. आणि तिथंच सुरू होते एक दुसरी सिस्टीम. हस­या चेह­याने ‘काम होईल हो‘ म्हणणा­या अधिका-­यांच्या मागे एक अशा यंत्रणेचा पडदा असतो,…

0 Comments

सिंधुदुर्गात वेश्याव्यवसाय ः लैंगिक शोषणाची काळी छाया

            निसर्गसंपन्न, शांत आणि ग्रामीण सौंदर्याने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा आज वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कोकणातील पर्यटनाच्या नकाशावर झपाट्याने वाढत असलेल्या या जिल्ह्यात, एका अनपेक्षित वास्तवाने डोके वर काढले आहे. ‘वेश्याव्यवसाय आणि त्यामागील मानवी तस्करीचा गुन्हेगारी जाळं.‘ गोवा कनेक्शनच्या…

0 Comments

पावसाच्या तडाख्यात व्यवस्थेच्या मर्यादा उघड

       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जे चित्र उभं राहिलं आहे, ते भयंकर आणि अस्वस्थ करणारं आहे. मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणपट्टा हादरला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की गावागावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या…

0 Comments

अफवांच्या अंधारात हरवलेला मीडिया

‘ऑपरेशन सिंदूर‘ या भारतीय सैन्यदलाच्या धाडसी आणि अचूक कारवाईने संपूर्ण देशात देशाभिमान आणि आत्मविश्वासाचं वातावरण तयार झालं. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयम राखून, परंतु प्रभावी पद्धतीने दिलेलं प्रत्युत्तर केवळ लष्करी ताकदीचं नव्हे, तर धोरणात्मक परिपक्वतेचंही प्रतिक होतं. ही कारवाई अत्यंत सूक्ष्म नियोजनात…

0 Comments

विकासाच्या संकल्पना बदलायला हव्यात!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील पंचवीस गावे केंद्र सरकारने पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. २२ एप्रिल रोजी पर्यावरण, जलवायू व परिवर्तन मंत्रालयाने ही अधिसूचना प्रसिद्ध करताच, स्थानिक पातळीवर तसेच पर्यावरण रक्षणासाठी झटणा­-या संस्थांमध्ये समाधानाची भावना उमटली. ही…

0 Comments

‘शक्तिपीठ‘ महामार्ग सह्याद्रीच्या मुळावर?

निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेल्या कोकणपट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरकपा­यात सध्या एक वादळ उठू पाहत आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा शेवटचा टप्पा या जिल्ह्यातून, विशेषतः सह्याद्रीच्या कोअर भागातून नेण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला आहे. हा निर्णय केवळ प्रशासनाचा किवा विकासप्रेमी धोरणांचा परिणाम नसून, त्यामागे…

0 Comments

महाराष्ट्र धर्म वाढवावा!!

  १ मे हा महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस. भाषिक अस्मितेच्या चळवळीतून जन्मलेल्या या राज्याने गेल्या सहा दशकांत प्रगतीची भरारी घेतली, पण आजच्या घडीला महाराष्ट्राच्या वाटचालीपुढे नवे प्रश्न उभे ठाकले आहेत. हे प्रश्न केवळ विकासाचे किवा रोजगाराचे नाहीत, तर स्वतःची सांस्कृतिक, भाषिक आणि राजकीय अस्मिता…

0 Comments

स्थलांतर रोखण्यासाठी शाश्वत विकासाचा राजमार्ग हवा

       कोकण म्हणजे निसर्ग, समुद्र, डोंगर, देव आणि आपुलकी; पण या भूमीतून माणसं गेली काही वर्ष गावं सोडून जात आहेत. ही एक सामाजिक आपत्ती आहे. जी ना भूकंपासारखी अचानक आली, ना वादळासारखी झपाट्याने. ही समस्या निर्माण झाली आहे, दीर्घकाळ चालत आलेल्या…

0 Comments

अभिव्यक्तीचा कंटेंट आणि इंटेंट

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिला आहे. हा अधिकार म्हणजे केवळ बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हे, तर विचार मांडण्याचे, लेखनाचे, सर्जनशील अभिव्यक्तीचे आणि कलात्मक निर्मितीचेही स्वातंत्र्य आहे. मात्र सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात या हक्कावर सामाजिक, राजकीय आणि प्रसंगी कायदेशीर मर्यादा येताना दिसत…

0 Comments

विधिमंडळात राजकीय रणनीती की जनतेच्या समस्या?

   सिंधुदुर्गसह राज्यभरातील मोडकळीला आलेली शासकीय आरोग्य व्यवस्था मोठ्या सुधारणेच्या प्रतिक्षेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालय या सर्वांच्या इमारती चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत. परंतु, त्यामध्ये रूग्णांवरती उपचार करणा­या पूर्णवेळ डॉक्टरचीच कमतरता आहे. ओरोस येथील…

0 Comments