‘शक्तिपीठ‘ महामार्ग सह्याद्रीच्या मुळावर?

निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेल्या कोकणपट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरकपा­यात सध्या एक वादळ उठू पाहत आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा शेवटचा टप्पा या जिल्ह्यातून, विशेषतः सह्याद्रीच्या कोअर भागातून नेण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला आहे. हा निर्णय केवळ प्रशासनाचा किवा विकासप्रेमी धोरणांचा परिणाम नसून, त्यामागे…

0 Comments

महाराष्ट्र धर्म वाढवावा!!

  १ मे हा महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस. भाषिक अस्मितेच्या चळवळीतून जन्मलेल्या या राज्याने गेल्या सहा दशकांत प्रगतीची भरारी घेतली, पण आजच्या घडीला महाराष्ट्राच्या वाटचालीपुढे नवे प्रश्न उभे ठाकले आहेत. हे प्रश्न केवळ विकासाचे किवा रोजगाराचे नाहीत, तर स्वतःची सांस्कृतिक, भाषिक आणि राजकीय अस्मिता…

0 Comments

स्थलांतर रोखण्यासाठी शाश्वत विकासाचा राजमार्ग हवा

       कोकण म्हणजे निसर्ग, समुद्र, डोंगर, देव आणि आपुलकी; पण या भूमीतून माणसं गेली काही वर्ष गावं सोडून जात आहेत. ही एक सामाजिक आपत्ती आहे. जी ना भूकंपासारखी अचानक आली, ना वादळासारखी झपाट्याने. ही समस्या निर्माण झाली आहे, दीर्घकाळ चालत आलेल्या…

0 Comments

अभिव्यक्तीचा कंटेंट आणि इंटेंट

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिला आहे. हा अधिकार म्हणजे केवळ बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हे, तर विचार मांडण्याचे, लेखनाचे, सर्जनशील अभिव्यक्तीचे आणि कलात्मक निर्मितीचेही स्वातंत्र्य आहे. मात्र सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात या हक्कावर सामाजिक, राजकीय आणि प्रसंगी कायदेशीर मर्यादा येताना दिसत…

0 Comments

विधिमंडळात राजकीय रणनीती की जनतेच्या समस्या?

   सिंधुदुर्गसह राज्यभरातील मोडकळीला आलेली शासकीय आरोग्य व्यवस्था मोठ्या सुधारणेच्या प्रतिक्षेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालय या सर्वांच्या इमारती चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत. परंतु, त्यामध्ये रूग्णांवरती उपचार करणा­या पूर्णवेळ डॉक्टरचीच कमतरता आहे. ओरोस येथील…

0 Comments

दृष्टीकोन महिला दिनाचा

         ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन‘ म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. या दिवसाला अलिकडे इव्हेंटचे स्वरुप आले आहे. संस्था, मंडळांच्या माध्यमातून या दिवसाचे औचित्य साधून महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे कार्यक्रम आयोजित केले जात…

0 Comments

परीक्षा पद्धतीत बदलाची गरज

        माध्यमिक शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. दहावीमध्ये उत्तीर्ण होणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला सहज जमत आहे. परंतु, टक्केवारी वाढविण्यासाठी अभ्यासामध्ये कठोर परिश्रम घ्यावे लागत आहेत. परीक्षेची भीती कमी झाली, तरी उत्सुकता मात्र, वाढलेलीच आहे. शिक्षणाचे बदलते…

0 Comments

मजबूत लोकशाहीसाठी गतिमान आणि उत्तरदायी प्रशासन

लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींच्या बरोबरीने राज्याचा कारभार चालवण्यासाठी नोकरशाहीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. लोकप्रतिनिधींनी जनतेसाठीच्या कल्याणकारी योजना मांडाव्यात आणि प्रशासनाने त्या कायद्याच्या, राज्यघटनेच्या चौकटीत बसवून त्यावर अंमलबजावणी करावी, अशी ही परस्परपूरक व्यवस्था होती. पण, जशी लोकप्रतिनिधींचा…

0 Comments

नवसरंजामशाहीचे आव्हान..!

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देश पातळीवरील आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलत गेले आहे. जो साम, दाम, दंड, भेद वापरत बाहुबली बनत जातो अशा एखाद्या नेत्याभोवती राजकारण फिरत राहते म्हणजे ‘कल्टपॉलिटिक्स‘. एखाद्या सर्वसामान्य माणसालाही लोकप्रतिनिधित्वाची संधी देणारी लोकशाही व्यवस्था अशी अपेक्षा स्वातंत्र्यानंतर काही वर्ष अनुभवायला…

0 Comments

 मंत्री महोदयांसमोर कोकणच्या सुनियोजित विकासाचे आव्हान

           महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे दणकट पाठबळ असलेले सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये कोकणातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र उदय सामंत, नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी तर दापोलीचे आमदार योगेश कदम यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. साहजिकच…

0 Comments