खराब वरण सामान्यांचं रोजच मरण

मंत्रालायाजवळ आकाशवाणी भवनासमोरील आमदार निवासात असलेले कॅन्टीन ही केवळ एक शासकीय खानावळ नसून, ती एक अशी जागा आहे जिथे महाराष्ट्राच्या कानाकोप­यातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थांबलेले आपण पाहतो. आमदार, त्यांच्या सहका­यांसाठी व मंत्रालयात येणा­या सामान्य जनतेसाठी ही एक महत्त्वाची सुविधा आहे. परंतु या…

0 Comments

मराठीचा आग्रह – अस्मितेचा आवाज!

           महाराष्ट्र शासन एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर करतं, आणि केंद्र सरकारकडून तो दर्जा अधिकृतपणे मंजूर होतो. मुख्यमंत्री जनतेसमोर उभं राहून सांगतात की ‘मराठी भाषेचा आग्रह असावा, पण दुराग्रह नको.‘ विविध पक्षांचे नेते,…

0 Comments

सणांचं निसर्गाशी नातं जपताना

जून-जुलैचे महिने म्हणजे निसर्गाचा पुनर्जन्म. आकाशात ढगांची गर्दी, मृदगंधाने भरलेली हवा आणि  सृष्टीत आलेली एक वेगळीच उर्जा. या ऋतूच्या सुरूवातीला आपली पारंपरिक संस्कृती विविध सणांनी नटलेली असते.    वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपंचमी, श्रावणातील सोमवार, हरितालिका आणि असेच अनेक सण याच काळात साजरे होतात.…

0 Comments

त्रिभाषेच्या आडून हिदी सक्ती नको…!

      वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकविण्याचा महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून त्रिभाषा सूत्र शासनाने पहिल्या इयत्तेपासून लागू करायचे ठरविले आहे. परंतु, आता या सूत्राच्या नावाखाली लहान मुलांवर तीन…

0 Comments

निकृष्ट कामात हरवले शिवरायांचे कर्तृत्व

देशभरात महापुरूषांचे पुतळे उभारण्याची चढाओढ काही नवीन राहिलेली नाही. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे स्मारक उभे करून त्याला अभिवादन करणे ही चांगली गोष्ट असली, तरी त्यामागे असलेली निष्ठा, सचोटी आणि पारदर्शकता ही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने, पुतळे उभे राहतात पण मूल्यं कोसळतात, याचेच एक गंभीर…

0 Comments

लाचखोर अधिका­-यांची सिस्टीम

आपण रोजच सरकारी दारात उभं राहतो. शासकीय कार्यालये, नगरपालिका, महसूल विभाग, शिक्षण खाते, पोलीस ठाणे. कोणते ना कोणते कागद, मंजुरी, तपासणी किवा प्रमाणपत्रासाठी. आणि तिथंच सुरू होते एक दुसरी सिस्टीम. हस­या चेह­याने ‘काम होईल हो‘ म्हणणा­या अधिका-­यांच्या मागे एक अशा यंत्रणेचा पडदा असतो,…

0 Comments

सिंधुदुर्गात वेश्याव्यवसाय ः लैंगिक शोषणाची काळी छाया

            निसर्गसंपन्न, शांत आणि ग्रामीण सौंदर्याने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा आज वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कोकणातील पर्यटनाच्या नकाशावर झपाट्याने वाढत असलेल्या या जिल्ह्यात, एका अनपेक्षित वास्तवाने डोके वर काढले आहे. ‘वेश्याव्यवसाय आणि त्यामागील मानवी तस्करीचा गुन्हेगारी जाळं.‘ गोवा कनेक्शनच्या…

0 Comments

पावसाच्या तडाख्यात व्यवस्थेच्या मर्यादा उघड

       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जे चित्र उभं राहिलं आहे, ते भयंकर आणि अस्वस्थ करणारं आहे. मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणपट्टा हादरला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की गावागावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या…

0 Comments

अफवांच्या अंधारात हरवलेला मीडिया

‘ऑपरेशन सिंदूर‘ या भारतीय सैन्यदलाच्या धाडसी आणि अचूक कारवाईने संपूर्ण देशात देशाभिमान आणि आत्मविश्वासाचं वातावरण तयार झालं. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयम राखून, परंतु प्रभावी पद्धतीने दिलेलं प्रत्युत्तर केवळ लष्करी ताकदीचं नव्हे, तर धोरणात्मक परिपक्वतेचंही प्रतिक होतं. ही कारवाई अत्यंत सूक्ष्म नियोजनात…

0 Comments

विकासाच्या संकल्पना बदलायला हव्यात!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील पंचवीस गावे केंद्र सरकारने पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. २२ एप्रिल रोजी पर्यावरण, जलवायू व परिवर्तन मंत्रालयाने ही अधिसूचना प्रसिद्ध करताच, स्थानिक पातळीवर तसेच पर्यावरण रक्षणासाठी झटणा­-या संस्थांमध्ये समाधानाची भावना उमटली. ही…

0 Comments