ज्ञानाच्या बाजारातील नवे सत्ताधीश

      इथल्या शोषण व्यवस्थेचे मूळ आणि बहुजनांच्या गुलामगिरीचे सार क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी अत्यंत अचूकपणे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी ‘विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्तविना शूद्र खचले । एवढे सगळे…

0 Comments

‘नीट’च्या गोंधळाला जबाबदार कोण?

        शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा खेळखंडोबा सुरू आहे, तो पाहता ही यंत्रणा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आहे की ते उद्ध्वस्त करण्यासाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत…

0 Comments

शिवरायांचा महाराष्ट्र की नराधमांचे नंदनवन? 

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला पाशवी अत्याचार आणि तिची दगडाने ठेचून केलेली हत्या ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर ती महाराष्ट्राच्या सामूहिक विवेकाची क्रूर थट्टा आहे. ज्या भूमीत ३८१ वर्षांपूर्वी अवघ्या १४-१५ वर्षांच्या शिवरायांनी रांझे गावच्या पाटलाचा गुन्हा शाबित…

0 Comments

​ संकटाच्या छायेत कोकणचा बागायतदार

कोकणच्या लाल मातीशी आणि इथल्या निसर्गाशी घट्ट नाते सांगणारा आंबा आणि काजूचा हंगाम हा केवळ शेतीचा विषय नसून, तो या संपूर्ण भूभागाचा आर्थिक कणा आहे. दरवर्षी जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवणारा हापूस आणि काजू उत्पादक बागायतदार आज एका अशा भीषण वळणावर येऊन उभा…

0 Comments

​प्रशासकीय दिरंगाईमुळे कर्मचारी वाऱ्यावर!

​ महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा रथ ज्या चाकांवर स्वार होऊन ग्रामीण भागातील शेवटच्या शाळेपर्यंत पोहोचतो, त्या रथाची चाकेच आज प्रशासकीय दिरंगाईच्या चिखलात रुतली आहेत. 'समग्र शिक्षा योजना बंद, ३,८०० कर्मचारी बेरोजगार' ही केवळ एक बातमी नाही, तर ती गेली १५ वर्षे रक्ताचे पाणी करून…

0 Comments

‘कागदी’ डॉक्टरांच्या विळख्यात जनतेचे आरोग्य..!

सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसमृद्ध आणि पर्यटनसंपन्न मानला जातो, पण याच जिल्ह्याच्या नशिबी आरोग्याचं 'वैराण वाळवंट' का यावं? हा प्रश्न आता केवळ तक्रारीचा उरलेला नाही, तर तो अस्तित्वाचा आणि संतापाचा झाला आहे. अलीकडेच कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि सावंतवाडी…

0 Comments

कोकणचा ‘आक्रोश’ आणि हवामान बदलाचे संकट!

कोकणची लाल माती आणि इथला माणूस तसा कमालीचा सोशिक आहे. निसर्गाच्या कुशीत वाढलेला हा माणूस समुद्राच्या लाटांप्रमाणे आयुष्यातील चढ-उतार पचवण्यात सरावलेला आहे. पण आज त्याच शांत कोकणच्या काळजातून अलीकडे वारंवार हुंदका बाहेर पडत आहे, ज्याने सह्याद्रीच्या कडांनाही पाझर फुटला आहे. गेल्या काही दिवसांत…

0 Comments

मराठी भाषेचा ‘अभिजात’ सोहळा आणि शाळांचा मरणप्राय टाहो!

​        महाराष्ट्रात दरवर्षी २७ फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतीला वंदन केले जाते, शासकीय स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करून 'विश्व मराठी संमेलने' भरवली जातात आणि समाजमाध्यमांवर मराठी प्रेमाचे उमाळे फुटतात. मात्र, या उत्सवी झगमगाटाच्या…

0 Comments

स्थानिक निवडणुकांचे बदलते वास्तव !

महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार 21 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. चार वर्षांपासून लांबलेल्या या निवडणुकांनी यंदा फार मोठा राजकीय ताण निर्माण केला. युती किंवा आघाडी न झाल्यामुळे भाजप-शिंदे…

0 Comments

निवडणुकांची बदलती “स्टाईल’

  "लीडर्स अँड फॉलोअर्स" या निबंधामध्ये म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाला दुस¬यावर हुकूमत गाजवण्याची ओढ असते. ज्याच्याकडे ताकद, साधनं किंवा अनुयायी असतील तोच नेता, आणि त्याची ही हुकूमत चालली नाही, की तो दुस¬याची हुकूमत सहज स्वीकारतो. हीच मानसिकता भारतीय राजकारणाचे वास्तविक चित्र स्पष्ट करते. राज्यकर्ता म्हणून…

0 Comments