पर्यावरण पूरक गणपती

गणपती विसर्जनावेळी होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी शुद्ध लाल मातीच्या पर्यावरणपुरक गणपतींची क्रेझ अस्तित्वात येत असून उत्स्फूर्त  प्रतिसादामुळे यावर्षी 500 गणेशभक्त पर्यावरणपुरक गणपतींचे पूजन करणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेंगुर्ल्याची सुकन्या व बेळगांव येथील रहिवासी बबीता भातकांडे-परब यांचा हा उपक्रम समाजाबरोबरच निसर्ग वाचविण्यासाठी महत्त्वाचा दुवा…

0 Comments

ओगले-फाटक यांचा बाप्पा

आपल्या प्रत्येक सणांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात आणि अशाच काही वैशिष्ट्यांमुळेच आपल्या सणांची उंचीही वाढली आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण सण साजरे करण्यासाठी प्रत्येक जण त्या त्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. असाच एक सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा, मनातील भक्ती जागृत करणारा गणेशोत्सव सणही विविध…

0 Comments

आईचे पुण्यस्मरण

           आई, स्मरण तुझ्या ममतेचे होई, तव उपकारा स्मित नाही, कैसी होऊ उतराई गे माझे आई           "आई' या जादुई व्यक्तिमत्वासाठी किती सार्थ ओळी आहेत ह्रा. आईबद्दलची कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्रावण…

0 Comments

हात

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे घेता घेता एकदिवस देणा-याचे हात घ्यावे       श्रेष्ठ-ज्येष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणा-याने देत जावे...‘ या कवितेतील ह्या ओळी अतिशय गहन आणि सत्य सांगून जातात.       ‘हात‘ हा ख-या अर्थाने मनुष्याच्या प्रगतीचा खूप मोठा…

0 Comments

लॉटरी

‘‘महाराज आपला दिल फार मोठा आहे. आप बहोत पुण्यवान हो, आपका आज भाग्य खुलनेवाला है! आप आज जरुर लॉटरी निकालो! धर्म करो‘‘ असे म्हणत तो कपाळावर भलामोठा टीळा लावून एक दाढीवाला माझ्या समोरच उभा राहिला. क्षणभर मी दचकलोच. अचानक काहीच सुचेना आणि माझी…

0 Comments

बॅ.बाळासाहेब खर्डेकर – वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक विकासाचे अध्वर्यू

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर गेली अनेक वर्षे वेंगुर्ल्याच्या विकासासाठी कोणत्याही राजकीय पुढा-यांची नजर पडली नव्हती असेच म्हणावे लागेल. सन १९५२ मध्ये नगर वाचनालयाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. खर्डेकर वेंगुर्ला येथे येतात. वेंगुर्ल्याच्या परिसराची त्यांना भुरळ पडते. निसर्ग संपन्न परिसर,…

0 Comments

संघर्ष कळणेवासीयांचा

मानसिंग राजाराम देसाई. वय वर्षे अंदाजे ६० च्या आसपास. कळणे खनिज विरोधी लढ्यात १०३ दिवस तुरुंगवास भोगणारे सामान्य शेतकरी. गुन्हा एवढाच कि  स्वतःच्या शाश्वत व पारंपरिक उपजीविकेचे साधन वाचविण्यासाठी खनिज प्रकल्पाला केलेला विरोध. मुजोर खाण कंपनीने सर्वच राजकीय पक्षांना आपल्या दावणीला बांधून घेतले.…

0 Comments

साखरपा गावाने केली पुरावर मात

 पश्चिम घाटातून वाहत कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे येणारी ‘काजळी‘ नदी पावसाळ्यात आपत्ती घेऊन येते, संपूर्ण बाजारपेठ आणि रहिवासी भाग पुरात जातो. पण या वर्षी हे घडलेच नाही. साखरपा पुरापासून वाचले! याला कारण गावक-यांनी केलेला नदीतील गाळमुक्तीचा निश्चय. दगड-गोट्यांच्या स्वरुपात येणा-या गाळाने निर्माण…

0 Comments

रामभाऊ म्हाळगी

   सत्ता असो किंवा नसो, देशासाठी काही कार्यकर्ते तळमळीनं काम करत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी सत्ता कुठेही दृष्टीक्षेपात नसताना, राजकीय सहकार्य मिळत नसतानाही अनेक वर्ष विरोधी बाजूला राहून, संघ विचाराचे अनेक नेते निष्ठेनं समाजकार्य करत होते. त्यापैकीच एक ’रामभाऊ म्हाळगी’.       रामभाऊ म्हाळगी यांचा…

0 Comments

संत साहित्यातील सकारात्मकता

संत पळपुटे होते, टाळकुटे होते. त्यांनी समाजाला निष्क्रिय बनवले असा आरोप संतांवर आणि संत साहित्यावर काहीजण वारंवार करत असतात. संत विचाराचे मर्म जाणून न घेता, त्यावर चिंतन मनन न करता संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावला जातो. म्हणूनच संत साहित्य नकारात्मक आहे की सकारात्मक,…

0 Comments