आर्ट अँड क्राफ्टमधून कलागुणांना नवी दिशा

            विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने श्री विठ्ठलराव जोशी चारिटेज ट्रस्ट इंग्रजी माध्यम शाळेत व्यावसायिक व कौशल्य शिक्षणांतर्गत ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…

0 Comments

रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर उपचार व मार्गदर्शन 

महिलांना वयाच्या एका टप्प्यानंतर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी फारशी जागरूकता नसते आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळणेही कठीण होते. हीच गरज ओळखून, डेरवण येथील बी.के. एल. वालावलकर रुग्णालय येथे आता रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर सखोल…

0 Comments

सरपंचांच्या मानधनातून स्कूलला इन्व्हर्टर भेट

आपल्या पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी न करता समाजकार्यासाठी कसा करावा, याचा एक नवा आदर्श मातोंड गावच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांनी घालून दिला आहे. त्यांनी स्वतःला मिळणारे सरपंच मानधन समाजकार्यासाठी खर्च करण्याचा एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या स्वयंप्रेरणेतूनच पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे…

0 Comments

रेडी ग्रा.पं.चा आदर्शवत उपक्रम

ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी ग्रामपंचायतीने एक आदर्शवत पाऊल उचलले असून रेडी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावतीने रेडी गावामध्ये ज्या जि. प. शाळा आहेत, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्या कुटुंबाची…

0 Comments

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती…

0 Comments

संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना गेल्या दोन वर्षांपासून स्मार्ट मीटरविरोधात आवाज उठवत आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असला तरी ग्राहकांचा त्याला विरोध आहे. सुरुवातीच्या टप्यात अनेक ठिकाणी जुने किंवा बंद पडलेले मीटर काढून त्यांच्या जागी स्मार्ट…

0 Comments

जिल्ह्यातील पडीक जमिनी बचतगटांना मिळणार

शासनाने शासकीय पडीक जमिनी या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ चे कलम ३८ मधील तरतुदीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, उमेद किंवा माविमअंतर्गत येणारे महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. चारा, बांबू व अपारंपरिक ऊर्जास्रोतांसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या…

0 Comments

शिरोडा-वेळागर ताज प्रकल्पाला मिळणार गती

शिरोडा-वेळागर येथील बहुचर्चित ताज प्रकल्प सुरू होण्यासाठी लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या १८५ खातेदारांना सुमारे ६० कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील त्रिपक्षीय कराराला मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाले…

0 Comments

खाऊगल्लीमुळे पर्यटनाला चालना मिळेल

बंदरावर वाढत असलेल्या गर्दीचा विचार करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा व पर्यटकांना अधिक चांगला आनंद लुटता यावा, यासाठी बंदरावर जाणाऱ्या मार्गावरील मांडवी रोडनजीक खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय वेंगुर्ले पालिकेने घेतला होता. या अनुषंगाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण…

0 Comments

श्री आनंदनाथ संजीवन समाधी उत्सव संपन्न

श्री स्वामी समर्थाचे अंतरंग शिष्य भक्तश्रेष्ठ महापुरुष श्री आनंदनाथ महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव सोहळा कॅम्प येथील समाधी मंदिरात २० जून रोजी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आनंदनाथांचे पणतू सचिन वालावलकर यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर स्वामी मठात आनंदनाथांची आरती व महाप्रसादाचा लाभ…

0 Comments