सर्वोच्च निकालाचा अन्वयार्थ
महाराष्ट्रात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटाने भाजपच्या केंद्रीय राजकीय नेतृत्वाच्या आश्रयाने, महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या संपूर्ण प्रक्रियेत राज्यपालांनी मनमानी पद्धतीने संसदीय व्यवहारात आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारात थेट हस्तक्षेप केला. ही सर्व प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने उघड करत राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. …
